खरंच किती बरं वाटतं
आपल कुणी असलं की
स्वर्ग दोन बोटंच उरतो
गालात कुणी हसलं की
जीव आपला वारा होतो
तुटलेला तारा होतो
समोरच्या गर्दी मध्ये
आपलं कुणी दिसलं की
आजुबाजुचे लोक तसे
आपले कुणीही नसतात
आपण जगाला विसरून जातो
जवळ कुणी बसलं की
कोण कुठली द्वारका ती
आपण तिला ओळखत नाही
का ळजाच्या जागेवरती
गाव प्रेमाचं वसलं की
खरंच किती बरं वाटतं
आपल कुणी असलं की
स्वर्ग दोन बोटंच उरतो
गालात कुणी हसलं की